हातकणंगले पोलीस स्टेशन विभाग व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यामधील बैठक काय होते मुद्दे ते पुढील प्रमाणे

साप्ताहिक अभिनव मराठी

 हेरले, माले, मुडशिंगी, चौकाक , अतिग्रे ,रूकडी, रुकडीवाडी माणगाव ,माणगाव वाडी या परिसरामधील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व हातकणंगले पोलीस स्टेशन विभाग यांच्यामध्ये मंगळवारी साईराज मंगल कार्यालय या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  ही बैठक शांततेत व सहकार्याने पार पडली या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून काही आव्हाने  करण्यात आली व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांच्याकडून काही अडचणी  व विनंती ही करण्यात आल्या




मागील काही वर्षापासून बंद गणराया पुरस्काराची सुरुवात पुन्हा करण्यात येणार असून जे गणेश उत्सव मंडळ परवानगी घेऊन गणेश उत्सवाची सुरुवात करतील व पर्यावरण पूरक तसेच आदर्शवत गणेश मंडळाला हा पुरस्कार देण्यात येईल

येणारा गणेश उत्सव हा पारंपारिक व पवित्र जपणारा असावा.  आणि या उत्सवात कोणत्याही प्रकारचा गोंधळ  घडूने   यासाठी पोलीस प्रशासन हे सक्रिय झाले असून पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या भागातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांना बैठकीस बोलवून त्यांच्या बैठक्या घेण्यात आल्या या मधलाच एक भाग म्हणून या परिसरामध्ये साईराज मंगल  अतिग्रे   कार्यालयामध्ये ही बैठक घेण्यात आली

यावेळी बोलत असताना  हातकणंगले पोलीस स्टेशनचे डीवायएसपी श्री  रवींद्र दिनकर पाटील यांनी काही सूचना केल्या . 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी संबंधित विभागीय पोलीस स्टेशनची परवानगी घेणे आवश्यक आहे. 
   जे गणेशउत्सव  मंडळ पूर्व  परवानगी घेणार नाहीत अशा मंडळांना मिरवणुकीसाठी किंवा डॉल्बी साठी परवानगी देण्यात येणार नाही
आवाजाची तीव्रता कमी असावी आणि ही तीव्रता मोजण्यासाठी संबंधित पोलीस विभागाकडे प्रशिक्षित अधिकारी तसेच मोजणी यंत्र उपलब्ध आहे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल
डोळ्याला अपायकार करणारे लेसर शो टाळावेत
मंडपाची उभारणी करत असताना योग्य दक्षता घ्यावी यामुळे कोणताही अपघात घडणार नाही याची काळजी घ्यावी वीज महामंडळाची योग्य ती परवानगी घ्यावी कारण प्रत्येक वर्षी शॉर्टसर्किटमुळे काही अपघात घडतात ते टाळता येतील .  विसर्जन मार्गाची रचना करण्यात येणार असून त्या मार्गानेच विसर्जन मिरवणूक काढावी. 
चुकीच्या गोष्टी किंवा प्रसंग सोशल मीडियावर प्रसारित करू नये



आपल्या धार्मिक कार्याची पवित्रता आपणच राखायचे आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अशीही या वेळेला मागणी  करण्यात आली
यावेळी काही नागरिकांनीही आपली मते मांडली यामध्ये अतिग्रे तलावातील पाणी कमी झाले असून  तलावामध्ये गणेश विसर्जन करणे हे शक्यतो करून टाळावे कारण हा गावासाठी पाण्याचा पिण्याचा एकमेव स्तोत्र आहे. अंशी मागणी ग्रा.प सदस्य भगवान पाटील यांनी केली . 
यावेळी हातकलंगले विभागाचे डी. वाय. एस. पी.श्री रवींद्र दिनकर भोसले, हातकलंगले पोलीस स्टेशन गोपनीय विभाग अधिकारी श्री संग्राम पाटील  हे उपस्थित होते
हेरले, रुकडी, माले ,मुडशिंगी, चौकात, अतिग्रे,माणगाव ,माणगाव वाडी रुकडीवाडी या ग्रामपंचायत विभागाचे पोलीस पाटील ,तसेच ग्रामपंचायत सदस्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते



Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.